शिक्षकांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे वाहक व्हावे – खासदार उन्मेश पाटील यांचे प्रतिपादन…

चाळीसगाव – सबला उत्कर्ष ( संजय चौधरी ) : कृषी, ऋषी आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता ही भारतीय संस्कृतीची तीन महत्वाची अंगे आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात केंद्र सरकारने ३४ वर्षानंतर सर्वसमावेश व भारताला आत्मनिर्भर बनविणारे शैक्षणिक धोरण मांडले आहे. हे धोरण रुजविण्यासाठी शिक्षकांनी समर्पित भावनेने काम करावे. असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी येथे केले.
आज पंचायत समितीच्या माजी सभापती स्मितल बोरसे तसेच माजी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजित तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आज टाकळी येथील रोटरी क्लब हॉल मध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी पत्रकार संजय चौधरी सबला उत्कर्ष तसेच व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार दैनिक ग्रामस्थचे झुंझार संपादक किसनराव जोर्वेकर, भाजप ज्येष्ठ नेते यू डी माळी सर, भाजप तालुकाध्यक्ष प्रा. सुनिल निकम सर , पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील, माजी सभापती संजय तात्या पाटील, माजी पंचायत समितीचे सदस्य बाजीराव नाना दौंड, आदर्श शिक्षक तथा शिंदी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्ष्मण चव्हाण, समारंभाचे आयोजक माजी पंचायत समितीचे सभापती स्मितल बोरसे, माजी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर डी चौधरी, सचिव एम बी आबा पाटील, साहित्यिक तथा पत्रकार जिजाबराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी यावेळी
मनोगत व्यक्त केले. भैय्यासाहेब वाघ यानी सूत्रसंचालन तर दिनेश बोरसे यांनी आभार मानले..

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *