शेतकऱ्यांसाठी छोटीशी खुशखबर शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव जाहीर… केंद्र सरकारचा निर्णय.

हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७० रुपये वाढ.

नवी दिल्ली : सबला उत्कर्ष प्रतिनिधी| केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे हमीभाव आज (ता.१) जाहीर केले आहेत. यात कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७०, भातात ५३, तूरीत २००, मूगात १४६ तर उडीदात ३०० रुपये गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ केली आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (ता.१) निर्णय घेण्यात आला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बैठकीनंतर हमीभावाच्या निर्णयाची माहिती दिली. कृषिमंत्री तोमर म्हणाले,‘‘केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने देशातील १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढविण्यास मंजूरी दिली आहे.’’
एमएसपी २०२०-२१ (प्रतिक्विंटल/रूपयात) 
(कंसात गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ)
भात/धान : १८६८ ( ५३)
भात/धान (ए ग्रेड) : १८८८ ( ५३)
ज्वारी : २६२० ( ७०)
ज्वारी मालदांडी : २६४० ( ७०)
बाजरी : २१५० ( १५०)
नाचणी : ३२९५ ( १४५)
मका : १८५० ( ९०)
तूर : ६००० ( २००)
मूग : ७१९६ ( १४६)
उडीद : ६००० ( ३००) 
भूईमुग : ५२७५ ( १८५) 
सूर्यफूल : ५८८५ ( २३५) 
सोयाबीन : ३८८० ( १७०) 
तीळ : ६८५५ ( ३७०) 
खुरासणी : ६६९५ ( ७५५) 
कपाशी (मध्यम धागा) : ५५१५ ( २६०)कपाशी लांब धागा : ५८२५ ( २७५)

‘‘जय किसान किमान आधारभूत मुल्यात निर्धारित वाढ करण्यात आली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *