महापुरग्रस्त शेतकऱ्यांना दिली भेट , मी आपला आवाज म्हणून काम करेन – संभाजीराजें

सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधि*

सोलापुर
संभाजीराजें महापुरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर…शेतकऱ्यांकडून जोरदार स्वागत. द्राक्ष आणि डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. सरकार च्या मदतीसाठी जाचक अटी असल्याने शेतकऱ्यांना मदत भेटण्यात अडचणी आहेत. अजित दादा पवारांनी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केल्याचे शेतकरी बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की केंद्र सरकार ने राज्याला निधी दिल्याशिवाय आम्ही मदत करू शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत होते.

संभाजीराजेनी शेतकऱ्यांचे पूर्ण गाऱ्हाणे ऐकून घेतले. व त्यांना विनंती केली की आपण मला सांगा मी काय केलं पाहिजे ते. शेती बाबत मला कमी माहिती आहे. आपण मला आपल्या अडचणी समजावून सांगा. मी आपला आवाज म्हणून काम करेन. केंद्र शासन असो की राज्य शासन, दोन्ही सरकारांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो असे ते म्हणाले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *