वादळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा : खा. रक्षा खडसे…

जळगाव :- सबला उत्कर्ष ( दीपक कांबळे ) : जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, यावल आणि भुसावळ तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्वारी, कापूस, भुईमूग, सोयाबीन, कांदा, मका, बाजरीसह केळी, पपईच्या बागांना फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तत्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अनेक शेतात पाणी शिरल्यामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळी पिकासह अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचे त्वरीत पंचनामे करावे, अशा सूचना खासदारांनी दिल्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *