अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा – खा.उन्मेश पाटील

जळगाव :- सबला उत्कर्ष ( संजय चौधरी ) : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, अमळनेर, भडगांव, चाळीसगाव आणि धरणगाव तालुक्यात शनिवारी दुपारी सुमारे दोन ते तीन च्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्वारी, कापूस, भुईमूग, सोयाबीन, कांदा, मका, बाजरीसह, केळी, पपईच्या बागांना फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तत्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अनेक शेतात पाणी शिरल्यामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

केळी, कांदा पिकासह अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचे त्वरीत पंचनामे करावे, अशा सूचना खासदारांनी दिल्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *