भाजपा नेते माजी मंत्री दिलीप गांधी यांचे निधन…

सबला उत्कर्ष ब्युरो –
अहमदनगर – माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते दिलीप गांधी यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली, ते 69 वर्षांचे होते. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली होती, त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

गांधी यांनी तीनवेळा नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार बनून प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीतच होते, आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दिलीप गांधी यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाजपच्या कामाला सुरुवात केली. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष,  भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहराध्यक्षाची पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली. 1985 ते 1999 पर्यंत अहमदनगर नगरपालिकाचे उपाध्‍यक्ष म्हणून काम पाहिले.

1999 मध्ये पहील्यांदा  लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. या कार्रयकाळात  2000 ते 2004 ग्रामीण विकास समिती आणि 2000 ते 2003 पर्यंत वित्‍त मंत्रालयाच्या सल्लागार समितिचे सदस्‍य होते. 2009 मध्ये दुसऱ्यांदा ते लोकसभेत निवडून गेले.तर २०१४ मध्ये तिस-यांदा लोकसभेवर निवडून आले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *