शिवडी येथील बी .डी .डी. चाळींचा पुनर्विकासाचा प्रश्न गेली पंचवीस वर्षापासून ऐरणीवर…
मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा….. मुंबई संदेश दयानंद मोहिते महाराष्ट्र संघटक …
मुंबई – सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- भेटीस वाली नायगाव वरळी डिलाईल रोड शिवडी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकासाचा प्रश्न गेली पंचवीस वर्षापासून यांनी वर आहे येथील रहिवासी मागणीचा विचार न करता महाराष्ट्र सरकार अनेक जाचक अटी घालून त्यांच्या अडचणीत भर टाकत आहे. काम करणार या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
१) पात्र अपात्र अट रद्द करावी
२)सध्या राहत असलेल्या बी.डी.डी .चाळी च्या जागेवरच नवीन इमारतीमध्ये घर मिळेल आणि तशी अग्रीमेंट व हमी विकासकडून रहिवाशांना देण्यात यावी.
३) कॉपर्स फंडाची रक्कम एक लाख वरून पंधरा लाख पर्यंत करावी.
४) ३९बी. कायदा रद्द करावा.
वरील दिलेल्या मागणीचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व माननीय गृहमंत्री जितेंद्र आव्हाड साहेब यांच्याकडे दिलेला असून रहिवाशांच्या मागणीचा विचार लवकरात लवकर बी.डी.डी.चाळींचा पुनर्विकास सुरू करण्यात यावा . या मागणी अगर मान्य नाही केल्या गेल्यात तर लवकरच या मागणीच्या संदर्भातील रहिवासी संघटनेचे राजू वाघमारे, संदेश मोहिते, सूनील वागमारे, स्वप्नील धिवार , प्रदीप खरात, प्रमोद पवार, किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.