रा.काँ.चे श्रीनिवास विरगोनवार यांच्या मागणीला यश शहरात पथदिवे लावण्याला सुरुवात…


21 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते

आशिष सुनतकर
जिल्हा गडचिरोली प्रतिनिधी ( सबला उत्कर्ष न्यूज )

अहेरी:– नगर पंचायतीच्या वतीने शहरातील अनेक ठिकाणचे पथदिवे लावण्याला सुरुवात झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार यांच्या मागणीला यश आले आहे.


गत 21 सप्टेंबर रोजी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्याकडे श्रीनिवास विरगोनवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेण्यात आली असून शहरातील बंदावस्थेत असलेल्या पथदिवे लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे उंच खांबावर चढण्यासाठी नगर पंचायत ट्रॅक्टरचा उपयोग करीत आहेत.
मागील कित्येक महिन्यांपासून नगर पंचायत हद्दीतील अनेक ठिकाणचे पथदिवे नादुरुस्त व बंदावस्थेत होते त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावे लागत होते या विषयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास विरगोनवार पुढाकार घेऊन नगर पंचायतीला निवेदन सादर करून लवकरात लवकर मागण्याची पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा ईशाराही दिले होते, अखेर त्यांच्या मागणीला यश आले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *