फडणवीस हे महाराष्ट्र द्रोही : अनिल गोटे…
धुळे : सबला उत्कर्ष ब्युरो :- भाजपच्या १०५ आमदारांना सत्तेत सहभागी न करवून घेता विरोधी बाकावर बसवले हे जिव्हारी लागल्याने भाजपने बदला घेण्याच्या उद्देशाने कांदा निर्यातीवर बंदी केली, असा अाराेप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अनिल गोटे यांनी केला. फडणवीस हे महाराष्ट्र द्रोही आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.कांदा निर्यातीवरील बंदी रद्द करण्यासाठी अांदाेलन अधिक तीव्र करण्याचाही इशारा त्यांनी दिला.
माजी आमदार अनिल गोटे म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांनीच उत्पादित केलेल्या मालाला चांगला दर मिळावा, निर्यातबंदी रद्द करावी म्हणून लढावे लागत आहे. मोदी, अमित शाह हे भांडवलशाहीला उत्तेजन देणारे केंद्रातील सरकार उलथवून टाकल्याखेरीज देश वाचणारच नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर होणारा अन्याय राष्ट्रवादी काँग्रेस कदापि सहन करणार नाही.यापुढे डॉ.अभिजित मोरे सांगतील तोच कार्यक्रम जिल्ह्यात राबवला जाणार असून, दुसऱ्या गटाला काहीही करू द्या. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही,असेही ते म्हणाले. डॉ. अभिजित मोरे म्हणाले, भाजपचे सरकार हे शेतकरी विराेधी अाहे. कांद्याचे भाव थोडेसे वाढताच त्यांनी निर्यातीवर बंदी घातली. हे चुकीचे आहे.