गोर गरिबांना स्वस्त धान्य केव्हा मिळणार (गरिबांवर उपासमारिचि पाळी )प्रशासनाला आर्त हाक…

सबला उत्कर्ष प्रतिनिधी : कुरखेडा : राकेश चव्हाण

ऑगष्ट महिन्याचा शेवटचा दिवस आला तरी अद्यापही निम्म्यापेक्षाही शासकीय स्वस्त धान्य दुकानात गरीबांना मिळनारे धान्य पोहोचले नाही. यामूळे गोर गरिबांना धान्य केव्हा मिळेल हा मोठा प्रश्न पडला आहे.ईतर बाबतीत कर्तव्यदक्षता दाखविणारया प्रशासनिक अधिकार्यांच्या नियोजनशुन्यते मूळे ही अवस्था गोर गरीब जनतेवर ओढवली आहे.व त्यांचेवर उपासमारिचि वेळ आली आहे.केंद्राकडून मिळणारे धान्य तर सोडा त्यानां दरमहा जे धान्य मीळत होते ते पण प्राप्त झालेले नाही. केंद्राकडून गहू तांदूळ ऐवजी अतिरिक्त कडधान्य मीळणार होते त्यामूळे ते वाटप झालेला नाही अशी माहिती आहे .आपल्या तालुक्यात वाटप होनारे धान्य इतर जिल्ह्यात पाठविला जात आहे का हे सुद्धा तपासने आवश्यक आहे. आगस्ट महिन्यात सण असल्यामूळे धान्य लवकर मिळेल ही जनतेची अपेक्षा होती परंतु त्यांची ही अपेक्षा हवेतच मुरली आहे. तरी वरिष्ट अधिकार्यांनि लक्ष देत त्वरित धान्य पुरवठा करावा अशी मागणी होत आहे.

स्वस्त धान्य दुकान…
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *