जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत सर्व शाळा राहणार बंद ; जिल्हाधिकारी राऊत यांचा आदेश…

जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत सर्व शाळा राहणार बंद ; जिल्हाधिकारी राऊत यांचा आदेश…

जळगाव : मयूर वागूळदे ( सबला उत्कर्ष ) :- जिल्ह्यासह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतचे सर्व वर्ग ७ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज काढले आहे.

गेल्या महिन्याभरापासून २३ नोव्हेंबर पासून ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला होता. मात्र दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांची येणे व जाण्याची गर्दी व काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ७ डिसेंबर पर्यंत कोणतेही वर्ग सुरू न करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतला आहे.
याबाबत आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेशाचे परिपत्रक काढले आहे. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून ७ डिसेंबर नंतर शाळा सुरू ठेवावे की नाही याचा निर्णय पुन्हा घेण्यात येणार असल्याचेही परिपत्रकात नमूद केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *