१६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत विनयभंग करून शेतात सोडले एकटे…

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत विनयभंग करून शेतात सोडले एकटे.

जळगाव : सबला उत्कर्ष न्युज ( मयूर वाघुळदे ) :- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीला गावातील तरुणाने प्रेमाचा बनाव करून पळवून नेले होते. गावापासून काही अंतरावर एका शेतात दोघे थांबले. दरम्यान, मुलगी झोपल्यानंतर तरुणाने तेथून पलायन केले. सकाळी मुलगी झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी या तरुणास अटक केली.

अमोल चंदन सोनवणे (वय २३) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने १४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता गावातील एका १६ वर्षीय मुलीस फूस लावून पळवून नेले. दोघे घरातून पळून गेल्यानंतर परिसरातील एका शेतात मुक्कामाला थांबले. तेथे अमोल याने मुलीचा विनयभंग केला. मध्यरात्री अमोलने शेतातून पलायन केले. सकाळी ६ वाजता ही मुलगी झोपेतून उठल्यानंतर अमोल तेथे नसल्यामुळे ती प्रचंड घाबरली. तेथून ती जळगावातील मैत्रिणीच्या घरी आली. दरम्यान, तिची बहीण व मेहुणे यांनी समजूत काढून तिला घरी आणले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *