ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक व्यवहारात अनियमितता, मालमतेचा अथवा निधीचा अपहार, कागज पत्रात फेरफार , खोटे कागदपत्राचा समावेश आढळल्यास पुढील प्रमाणे कार्यवाही करता येते…

ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक व्यवहारात अनियमितता, मालमतेचा अथवा निधीचा अपहार, कागज पत्रात फेरफार , खोटे कागदपत्राचा समावेश आढळल्यास पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.

सबला उत्कर्ष ( एकनाथ भोये ) :- ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक व्यवहारात अनियमितता मालमतेचा अथवा निधीचा अपहार यास ग्रामपंचायत सदस्य जबाबदार असल्यास किंवा ग्रामपंचायत मधील मूळ कागद पत्रात खोट्या ,बनावट कागद पत्रांचा समावेश केल्यास किंवा फेरफार केल्यास तो गुन्हा असून या संबंधी फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे .

ज्या प्रकरणांत कोणतीही चौकशी झालेली नाही अशा प्रकरणात प्रथम गटविकास अधिकारी यांनी एक महिन्याच्या आत प्राथमिक चौकशी करावी. गटविकास अधिकारी यांनी गुन्ह्यामध्ये प्रथमदर्शी तथ्य आढळून आले आहे किंवा नाही याचा स्पस्ट निष्कर्ष काढला पाहिजे .
चौकशीअंती सरपंच किंवा उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी , ग्रामपंचायत कर्मचारी यापैकी कोणीही किंवा सर्वजण दोषी आढळल्यास त्याचे विरुद्द गटविकास अधिकारी यांनी गुन्हे दाखल करावेत . ज्या प्रकरणामध्ये अपहाराची रक्कम निश्चित केली आहे त्याबाबतीत फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच अपहाराची रक्कमही वसूल करण्याची कार्यवाही करण्यात यावी .
गटविकास अधिकारी यांनी एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण केली आहे किंवा नाही किंवा चौकशी करण्यास टाळाटाळ केली आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद हे गटविकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करतील .
सरपंच किंवा उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांचे विरुद्द फौजदारी गुन्हा दाखल दाखल केल्यानंतर त्याचे विरुद्द महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1959 च्या कलम 39 अन्वये तात्काळ कार्यवाही सुरू करावी .तसेच ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी , ग्रामपंचायत कर्मचारी यांचे विरुद्द फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी .
एकनाथ भोये…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *